वनावल ग्रामपंचायत च्या कारभारावर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह
गावात गटार बांधकाम करून सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील वनावल गावात गल्लीतील गटारीचे बांधकाम करून तेथे साचणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी गटार बांधकाम करून सदर पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र ग्रामस्थ सागर नारायण धनगर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांना दिले आहे.
ग्रामपंचायत कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून वनावल ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार सुरू असून शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असताना आमच्या गावातील आमच्या भागाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष केले आहे. घरासमोर गटारीचे पाणी साठल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून याबाबत वारंवार ग्रामसेवक व सरपंच यांना विनंती केली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत कागदपत्र मागणी केली असता की दिली जात नाही व वारंवार टाळाटाळ केली जाते. अनेक वेळा तक्रारी अर्ज ग्रामपंचायत मध्ये स्वीकारले जात नाही.
याबाबत आपण दखल घेऊन आपण सरपंच व ग्रामसेवक यांना आदेशित करून ठिकाणच्या गटाचे बांधकाम करून पाण्याचे नियोजन करावे जेणेकरून भविष्यात ग्रामस्थांना रोगराइला सामोरे जावे लागणार नाही, व सांडपाणी रस्त्यावर इतरत्र वाहून जाणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करून तात्काळ काम करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सोबत गावातील घाणीचे साम्राज्य असलेले फोटो देखील या सोबत जोडण्यात आले आहेत.
