ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत यांना निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
मुंबई,दि.६ :- ,मुंबई येथील मुक्त पत्रकार संघाने नुकतीच एक राज्यस्तरिय निबंध स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातून पत्रकारांना यात सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते.
पत्रकारिता - काल,आज अन् उद्या* हा विषय होता.सदर लेखाची शब्द मर्यादा तीन हजार ऐवढी होती.यात सुमारे ३०० स्पर्धकांनी आपले निबंध सादर केले होते.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर आयोजकांकडून निबंधांचे तपासणी व मूल्यमापन केल्यानंतर या स्पर्धेतील विजेत्याची घोषणा करून नावे जाहीर करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत ज्येष्ठ पत्रकार रणवीर राजपूत यांना निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून त्याबद्दल प्रमाणपत्र अन् रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
यांना मिळालेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य घरातून विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

