मुंबई प्रतिनिधी - आर्थिक संकटात सापडलेल्या घरगुती व शेतीपंपाच्यावीज ग्राहकावर वीज दरवाढीचे संकट ओढवले आहे. महावितरणच्या थकबाकी थकबाकीच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी महावितरण कडून वीज दरवाढीचे संकेत मिळत आहेत. मात्र यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडणार असल्याने शासकीय विभागाकडे असलेली थकबाकी सक्तीने वसूल करावी अशी देखील मागणी पुढे येत आहे.
दरम्यान विज बिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे ती थांबवावी अशी शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी होती राज्यात अनेक भागात लाखो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले असताना बिलाची सत्तेची वसूल करणे अन्यायकारक ठरेल अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली होती. यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने चालू विज बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्याच्या निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जाहीर केला आहे आणि त्या अनुषंगाने कृषी पंपाचे कनेक्शन कापण्यास स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे चालू विज बिल भरून कनेक्शन कायम ठेवण्यास लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
राज्यात 46 हजार कोटींची जवळपास 40 लाख वीज कनेक्शन धारकांकडे थकबाकी आहे एकंदरीत 70 हजार कोटींची थकबाकी राज्यातील विविध प्रकारच्या घरगुती औद्योगिक कृषी इत्यादी विभागांकडे आहे. मात्र आता फडणवीसंच्या निर्णयानंतर व याची लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल हे लवकरच समोर येईल.
मात्र तरी देखील शेती पंपांचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू राहिली तर याबाबत मोठे जन आंदोलन उभे राहण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

