शिरपूर : शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात शासन स्तरावर हवामान व पर्यावरण बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ची प्रभावी अंमलबजावणी करणे सुरु असून लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी सर्वांना हरित शपथ दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगरसेवक वासुदेव देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नागरिकांना जास्त ई-वेहिकल चा वापर करुन पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले. भविष्यात कृषि उत्त्पन्न बाजार समितीच्या आवारात बटरफ्लाय गार्डन व माझी वसुंधरा मार्ग तसेच तुळशी गार्डनची निर्मिती करण्यात येईल असे कार्यक्रमा दरम्यान सांगितले. कार्यक्रम बाजार समितीचे सभापती नरेंद्र सिसोदिया, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नोडल अधिकारी सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, कर प्रशासन अधिकारी नेहा निकुम, विभाग प्रमुख भाईदास भोई, जयवंत माळी, राजेंद्र मराठे, किरण चव्हाण, शहर समन्वयक दिव्या तोरीस, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, राजू पाटील, मुस्ताक हनीफ, प्रज्ञशील निकम, मनोहर थोरात उपस्थित होते.
Tags
news


