महामार्गावर राज्य सीमेवर जामनिया गावाजवळ कोंबड्या भरलेले पिकअप वाहन पलटी, नागरिकांनी 600 पेक्षा जास्त कोंबड्या नागरिकांनी लुटल्या






मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहन सोमवारी राज्य सीमेवर अपघात झाल्याने पलटी झाला या अपघातात वाहनातून 600 पेक्षा जास्त कोंबड्या नागरिकांनी लुटून नेल्याने वाहनांसह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


           मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून शिरपूर कडून बडवाणी कडे जाणाऱ्या एमपी 46 जी 2105 हे कोंबड्या वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचे राज्य सीमेवरील जामनिया शिवारात कुत्रा वाचवितांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप कठड्यावर आदळल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला.अपघातात वाहन मालक रोहित व चालक मोहम्मद जिलानी हे किरकोळ जखमी झाले अपघात ग्रस्त वाहनात 600 पेक्षा जास्त कोंबड्या असल्याने कोंबडयाची लूटमार करण्यासाठी नागरिकांनी  एकच गर्दी केली होती.दरम्यान वाहनातील सर्व कोंबड्या नागरिकांनी लुटून नेल्याने वाहनाच्या नुकसानिसह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याप्रकरणी वाहनाचे चालक मोहम्मद जीलानी यांनी बिजासन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने