हिनाताई व चंदूभैया! ही वेळ राजकारण, आरोपप्रत्यारोपाची नाही: सुशिलकुमार पावरा




रत्नागिरी: आदरणीय डाॅ.हिनाताई गावीत व माननीय चंदूभैया ही वेळ राजकारण,आरोप प्रत्योरोपाची  नाही. खरंच ही वेळ राजकारण करायची आहे का? आरोप प्रत्योरोप करायची आहे का? याचे उत्तर फक्त होय किंवा नाही,मध्ये मला पाठवा.असे आवाहन सुशिलकुमार पावरा समाजसेवक तथा बिरसा क्रांती दल कोकण विभाग प्रमुख यांनी नंदुरबार कर व आदिवासी जनतेला केले आहे. 


           डाॅ.हिना गावीत खासदार नंदुरबार व माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यात कोरोनावरून कलगीतूराचा सामना रंगला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचे विडीओस सोशल मिडीवर वायरल होत आहेत. दोघांचेही विडीओस मी बघितले आहे. 
      चंदूभैया यांनी जे म्हंटले तेही खरं आहे,कारण नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने हिनाताई यांच्या कामा कडे बघून किंवा डाॅ.विजयकुमार गावीत यांच्या कडे बघून मते दिली नाहीत. फक्त मोदींकडे बघून मते दिली.मोदी लाटमुळेच हिना गावीत निवडून आल्या. मोदी लाटेत ज्यांना कोणी ओळखत नाही,ज्यांचे कर्तृत्व शुन्य आहे,असे उमेदवार ही निवडणूक आले आहेत.हे खरे आहे,हे सत्य कोणीही नाकारणार नाही. आणि हेही खरे आहे की,आज चंदूभैया ज्या शिवसेना पक्षात आहेत. त्या शिवसेना पक्षाचे नंदुरबार जिल्ह्यात अस्तित्व नव्हते.आजही शिवसेनाचा नंदुरबार जिल्ह्यात एकही आमदार नाही. चांगले काम केले तर अस्तित्व निर्माण होऊ शकते. हेही नाकारता येणार नाही. 
      डाॅ.हिना गावीत यांची जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याशी काय दुश्मनी आहे?की डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या वर त्या सारख्या आरोप करत आहेत." नंदुरबार बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा" अशा बातम्या देशभर फिरत आहेत. संपूर्ण देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांचे कौतुक केले जात आहे. सिने अभिनेता अजय देवगण व अमिर खान राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. हिंदी न्यूज,मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर मा.उच्च न्यायालयाने सुद्धा  कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील  कामाचे कौतुक केले आहे.  अशा वेळी हिना गावीत खासदार नंदुरबार यांनी राजेंद्र भारूड यांच्यावर आरोप करण्याऐवजी प्रशंसा केली पाहिजे. त्यांना साथ दिली पाहिजे. मात्र तसे होत नाही आहे. हिना गावीत यांनी राजेंद्र भारूड यांचे कौतूक केले तर हिना गावीत यांची ऐपत वाढेल,लोक त्यांचे कौतुक करतील. नंदुरबार कलेक्टर यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम खासदार हिना गावीत करीत आहेत. 
         नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार  करून संपूर्ण देवासमोर आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हीनाताई गावीत यांच्या कडून कलेक्टर राजेंद्र भारूड यांचे कौतूक करायला तोंडातून दोन शब्द बाहेर पडत नाहीत. उलट राजेंद्र भारूड यांची ऑक्सीजन प्लांटबाबत थापेबाजी, खोट्या बातम्या,खोटी माहिती,नंदुरबार मध्ये ऑक्सीजनचा तुटवडा वगैरे बोलून राजेंद्र भारूड यांचे खच्चीकरण करत आहेत. याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो.असे सुशिलकुमार पावरा म्हणाले.
      जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या वर आरोप करून हिना गावीत खूप मोठी चूक करत आहेत. याचे त्यांना नूकसानच होणार आहे. खरं पाहिलं तर राजेंद्र भारूड हे स्वत: डाॅक्टर असून आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांना आदिवासी जनतेच्या समस्या ब-यापैकी माहिती आहेत. अशा वेळी चांगले काम करणा-या अधिका-याचे मनोबल वाढवले पाहिजे. 
        जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या वर आरोप करून चंदूभैयालाही याचा फायदा होणार नाही व हिना गावीत यांना तर याचा अजिबात फायदा होणार नाही.यावेळी हाॅस्पीटलची,बेडची,रेमडीसीवरची,औषधांची,ऑक्सीजनची सोय रूग्णांसाठी करा. निवडूकीच्या वेळी हवं तेवढं  राजकारण करा. ही वेळ राजकारण करण्याची किंवा आरोप प्रत्योरोप करायची नाही,अशी विनंती सुशिलकुमार पावरा सामाजिक कार्यकर्ता तथा कोकण विभाग प्रमुख  बिरसा क्रांती दल यांनी  सर्व  राजकारण्यांना केली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने