नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून
नाशिक-:.नाशिक शहर व जिल्ह्यातील तसेच उतर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे सुरू करा ह्या मागणीसाठी ९/९/२०२० बुधवार रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि रि.पा.ई(आठवले)पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख मा.प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रि.पा.ई (आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज माननीय निवासी जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन निवेदन दिले..
निवेदनात म्हटले आहे की धार्मिक कार्यक्रमांना केंद्र सरकारने परवानगी दिल्याची मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्वधर्मीय प्राथनास्थळे सुरू करण्यासाठी सुरक्षेचे नियम फिजिकल डिस्टन्स पाळून पोलीस बंदोबस्त ठेवून सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करावीत
सदर प्रसंगी रि.पा.ई (आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, जेष्ठ नेते तानाजी शिंदे,जेष्ठ नेते नंदुभाऊ काळे, युवा नेते सतिषजी साबळे, ऋषिकेश आढाव,युवा नेते प्रशांतभाऊ गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
