निवडणुकीच्या तोंडावर खोटे आरोप करणाऱ्यांना डॉक्टर ठाकूर यांचे रोखठोक उत्तर
आरोप करणाऱ्या संस्थेला न्यायालयाकडून दहा हजार रुपयांच्या दंड, तरी न्यायालयाचा अपमान
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून प्रमुख सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाविकास आघाडी कडून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या जात प्रमाणपत्रावर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला. आणि त्याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
त्यामुळे या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या सर्व आरोपांना डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी एका पत्रक काढून उत्तर दिले आहे.
यात नमूद करण्यात आले की दिनांक सात ऑगस्ट 2024 रोजी एक पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी माझ्यावर बेछूट खोटे आणि बनावट आरोप केले आहेत.
जनसामान्यांचे माझेवर असलेले प्रेम व त्यापोटी विरोधकांना धडकी भरल्यामुळे, मतदार माता बधिनींची दिशाभूल करण्याचा दृष्ट हेतु साध्य करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला दिसतो. मात्र सर्व सामान्य जनतेला सदरचे षडयंत्र व त्यामगचे करते करविते विरोधी पक्षातील धन धनाड्यांबाबत संपूर्ण जाण आहे. तरी देखील जाती जमातींमध्ये गैरसमज पसरविण्याचा व द्वेष निर्माण करुण ऐन विधानसेभा निवडणुकीच्या तोंडावर सदरचे कुभांड रचुन स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याचा गैर हेतु दिसतो. जाती जातींवर विरोध करण्याऐवजी गोरगरीब माझ्या आदिवासी बांधवांच्या मुलभूत गरजा सोडविण्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.
जनतेमध्ये गैरसमज पसरुनये म्हणून मला सदरचे उत्तर देणे भाग पडले आहे. संबंधीतांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही एक तथ्य नाही. मुळात संपुर्ण महाराष्ट्रात रहिवास करण्याऱ्या माझ्या ठाकूर अनुसुचित जमातीस भारत स्वातंत्र्य झाल्यापासून व आरक्षणाबाबत प्रथम राष्ट्रपती आदेश सन १९५० ला लागु झाल्यापासून अनुसुचित जमाती संवर्गात वर्गीकृत करण्यात आले होते व आहे आणि तेव्हापासून आजतागायत आम्ही सर्व अनुसुचित जमातीचे लाभ देखील घेत आहोत,
मात्र सदरच्या गैर प्रवृत्तींनी आम्हाला वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच आधारावर काल केलल्या आरोपांमध्ये खान्देश इलाक्यातील ठाकूर अनु. जमाती वर्गात येत नाही त्यास सन १९५६ ला क्षेत्रबंधन लागु केल्या मुळे ठराविक जिल्हे व त्यातील तालुक्यांमधीलच ठाकूर हे अनु. जमातीत मोडतात असा बेछुट व चुकीचा अपप्रचार करण्यात आला. मुळात महाराष्ट्र शासनालाच या सदरच्या चुकीच्या अन्यायकारक अश्या क्षेत्रबंधनबाबतची अट ही चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सन १९७६ ला कायद्यात दुरुस्ती करुण सन १९५० पासूनच्या आम्हांस सवलती पुर्ववत प्रदान करण्यात आलेल्या आहेत व आज पर्यंत सवलती चालु आहेत. आणि सदरची बाब मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील अधोरेखीत केलेली आहे. मात्र असे असतांना देखील बेछूट आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच गैरप्रवृत्तीमुळे संबंधीत तथाकथित आदिवासी नोकरवर्ग ठाकूर उत्कर्ष संस्था हिला मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी याचिका क्रं. ३२६६/२०२१ मध्ये नुकताच म्हणजे दि. ०२/०७/२०२४ रोजी आदेश पारित करुण रक्कम रुपये १०,०००/- दंड देखील ठोठावला आहे.
सदरचे आरोप करून संबंधीतांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचा व उच्च न्यायालयाचा देखील अवमान केलेला आहे. मला सुमारे ११ वर्षांपूर्वी संपूर्ण चौकशीअंती समितीस्तरावर वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. संबंधीतांनी दृष्ट हेतुने विधानसभा निवडनुकीची पार्श्वभुमीवर व माझ्यावर जनतेचे वाढते प्रेम बघुन ११ वर्षांनंतर पुन्हा माझ्या वैधता प्रमाणपत्रास पडताळणी समिती येथे आव्हानित केले होते ज्यात पुन्हा सखोल चौकशी करूण व माझी बधिणी बेबीताई पावरा यांचे संपूर्ण कथन नव्याने ऐकून निव्वळ मी खऱ्या अनु. जमातीतील असल्याने श्रीमती. पावरा यांची तक्रार खारीज करून मला ११ वर्षापुर्वी दिलेले वैधता प्रमाणपत्र हे खरे व योग्य आहे असे २७ पानी निकाल देखील म. समितीने दि. २५/०७/२०२४ रोजी पारित केलेला आहे. यावरून देखील संबंधीतांची गैर व खोटी प्रवृत्ती निदर्शनास येते. येत्या विधानसभा निवडणुकीत मला जनतेपासून लांब करून न्यायालयीन प्रक्रीयेत व्यस्त ठेऊन व मला त्रास देऊन संबंधतांनी माझ्या विरुध्द पुन्हा मा. उच्च न्यायालयात समितीच्या आदेशास आव्हान दिलेले आहे.
सदरचे प्रकरण मा. उच्च न्यायालयात प्रलंबीत असतांना न्यायालयाचा आदेश घेण्यापुर्वी स्वतःला न्यायाधिश समजुन माझ्यावर खोटे आरोप करूण विरोधकांच्या मनात माझ्याबद्दल धडकी भरल्याचे पुर्णपणे सिद्ध होते. माझ्या ठाकूर अनु. जमातीस त्रास देणाऱ्या प्रवृतींच्या विरोधात नुकताच मा. सर्वोच्च न्यायालय सोो. दिल्ली यांनी सिविल अपील क्रं. २५०२/२०२२ महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात संरक्षण समिती वि. महाराष्ट्र शासन वगैरे या प्रकरणात दि.२४/०३/२०२३ आदेश पारित करूण माझ्या ठाकूर जमातीचे अनु. जमातीतील असलेले अस्तीत्व ग्राह्य धरलेले आहे. असे असतांना देखील कालच्या मुलाखतीत माझ्याविरुध्द आरोप करणे म्हणजे स्वतःला सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे समजण्यासारखे आहे. जे न्यायालयाच्या आदेशांचा आदर राखत नाहीत ते सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर राखुच शकत नाही हे त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतुन अधोरेखीत करुन दिले आहे. मी व माझे कुटुंब ठाकूर या अनु. जमातीतीलच असल्यामुळे माझ्यासकट माझ्या कुटंबातील अनेक सदस्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वेय व म. पडताळणी समितीच्या आदेशान्वेय वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे संबंधीतांनी खोट्या स्वरुपाचे आरोप करून जनतेची दिशाभूल न करता प्रामाणिकपणे जनतेची सेवा करूण जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे गरजेचे होईल. माझा भारतीय संविधानावर पुर्ण विश्वास असून भारतीय लोकशाहीचा पाया मजबुत करण्यासाठी सर्वांनी संविधानिक पद्धतीने निवडणुक प्रक्रीयेत भाग घेणे आवश्यक होईल. कुण्या स्वार्थी, विरोधी व एकअधिकारशाही धनाड्यांच्या आहारी जावूण असंविधानीक कृत्य कोणीही करु नये. कालच्या झालेल्या पत्रकार परिषेदाचा करता करविता धनी कोण आहे ???? हे संपूर्ण तालुका व माझा आदिवासी बांधव जाणुन आहे. मायबाप जनतेनेही असल्या अफवांना व आरोपांना बळी पडू नये हे मी या पत्रकाच्याद्वारे आपल्या माध्यमातुन विनंती करीत आहे. माझा न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे मा. उच्च न्यायालयदेखील समितीचा आदेश कायम करुन संबंधीतांची तक्रार पुन्हा खारीज करेल असा ठाम विश्वास आहे. आपल्याकडुन देखील अनमोल सहकार्याची अपेक्षा आहे.
अशी माहिती अधिकृतरित्या डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी सदर आरोपांना उत्तर देताना दिली आहे.
