*महाराष्ट्र राज्य देशाचे ग्रोथ इंजिन*
*जनतेच्या विकासासाठी शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
मुंबई, दि.२९ : महाराष्ट्र हे देशात नंबर वन राज्य ठरले आहे. देशाचे ग्रोथ इंजिन आहे. जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार महिला, युवक,शेतकरी, जेष्ठ नागरिकांना सह सर्व स्तरातील नागरिकांना विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आयटीसी ग्रँट सेंट्रल हाँटेल मुंबई येथे
न्युज १८ इंडिया या वाहिनीच्या 'डायमंड स्टेट समिट महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत प्रगतिशील महाराष्ट्रावर चर्चा दरम्यान ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. देश ५ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा राहणार असून १ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात आम्ही विकासाची कामं करत आहोत. राज्यात विकासाची कामं सुरू. समृद्धी हायवे, कोस्टल रोड बनवला. महाराष्ट्रात मेट्रो प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यात रस्त्याची कामं वेगाने सुरू आहे. देशातील सर्वात मोठा बोगदा राज्यात. मुंबईत वेगाने मेट्रोचे जाळे पसरतय. दोन वर्षात देशाच्या विकासात राज्याचे मोठे योगदान आहे. राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर वेगाने सुरू. दावोसमध्ये अनेक MOS वर स्वाक्षरी केली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीचा वेगाने विकासित होत आहे. इंडस्ट्रीमुळे राज्यात रोजगार निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. साडे पाच हजार कोटी खर्च करून दिघी बंदर उभारणार. तब्बल ६ हजार एकर परिसरात बंदर उभारणार. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले आहे.उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुमीपुजन होणार आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहे. सुरक्षा दिली आहे.बाहेरून येणाऱ्या उद्योगांना शासनाविषयी विश्वास निर्माण झाला असल्याने अनेक नवीन सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले,राज्यात पायभुत सुविधा मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाला सुरू झाले आहेत. आनखी कामे सुरू आहेत.समृद्धी महामार्गावर, अटल सेतु ,कोस्टल रोड नागरिकांना वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.नागरिकांचा वेळ,पैसे बचत होवून आणि प्रदूषण नियंत्रण होण्यास मदत झाली आहे.
सर्वसामान्य घरातील महिलांना घर चालवण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्या लक्षात घेऊन आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. १ करोड पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेता आला आहे.. तसेच लाडकी बहीण योजनबरोबरच लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे.त्या अंतर्गत आपण मुलांना सहा हजार, आठ हजार ,दहा हजार याप्रमाणे स्टयपेंड देवून स्कील रोजगार निर्माण कला आहे.
मराठा आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सरकारची भूमिका आरक्षण कमी करण्याची नाही. सरकारने मराठ्यांना १०% आरक्षण दिले आहे. तसेच त्या अनुषंगाने ओबीसी सारख्या सवलती मराठ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्यासाठी अनेक सवलती, योजना सरकारने तयार केली आहेत. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यंतचे वीज बील माफ करण्यात आले आहे. जे शेतकरी सोलर लावण्यास इच्छुक असतील त्यांना देखील सरकार मदत करत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासन नियमांमध्ये बदल करून त्यांना जास्तीत जास्त फायदा करून देत आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा नक्षलवाद हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीतील नक्षली जागा बरखास्त केल्या आहेत. तेथील लोकांना सुरक्षित वातावरणात राहता यावे यासाठी राज्य सरकारने विविध उपाय योजना केल्या आहेत. नक्षली विभागात शाळा, कॉलेज, रुग्णालये इत्यादी सुविधा सुरू केल्यामुळे आता महाराष्ट्रातील नक्षलवाद हळूहळू पूर्णपणे नष्ट होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
शासनाने राज्याच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांची आपल्या वृत्त वाहीनीच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी असे सांगून 'न्यूज 18 इंडिया' ला शुभेच्छा दिल्या.
000000000
