ऐन थंडीत राज्यात पाऊस कोसळणार, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा. प्रतिनिधी दत्ता पारेकर

 



पुणे: राज्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हलकीशी गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली. 

पण आता अचानक झालेल्या हवामानातील बदलांमुळे थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अशात हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

आधीच राज्यात पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला.


गेल्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे थंडी कमी झाली आणि उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. 

अशात आता राज्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे ऐन उसाच्या गळीप हंगामात शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे.

 राज्यात सकाळी थंडी दुपारी ऊन आणि संध्याकाळी वातावरण दमट होत असल्याचं चित्र आहे.

अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. 

याचा परिणाम पुढचे काही दिवस राज्यात पाहायला मिळणार आहे. यातच उत्तरेकडून होणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव कमी झाल्यामुळे राज्यात थंडीही कमी झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका बसत असला तरी उकाड्यात वाढ झाली आहे.

 दरम्यान, गोवा, कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांसह राज्यातल्या इतर भागांमध्ये पावसाने हजारी लावली.

 त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने