मुंबई (प्रतिनिधी )जी नॉर्थ मनपा विभाग दादर कार्यालय च्या गेट बाहेर आजाद समाज पार्टी मुंबई प्रदेश च्या वतीने " उद्रेक मोर्चा "घेण्यात आला यावेळी मोर्च्यातील प्रमुख विषय पाण्याची सोय न केल्या बाबत पूर्ण ठिकाणी सौचालय ची सुविधा न पूर्वील्या बाबत ज्या ठिकाणी लोकांची राहण्याची सुविधा ना कार्पेट टाकले जमिनीवर रात्रभर भिम अनुयायीना मातीमध्ये राहावे लागले अन्न पुरवठा न केल्याने भुकेने तडफडाव लागल मनपा प्रशासनाने सॅनिटाइझ व मास्क वाटप न करता जनतेस वेठीस धरले या मगरूर हिटलर शाही राज्य व मनपा सरकार विरुद्ध दिनांक 13 डिसेंबर 2021रोजी दुपारी 2 वाजता उद्रेक मोर्चा काढण्यात आला, यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष कैलास जैस्वार महासचिव अतुल खरात, ऍड सतिश शिंदे, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष संदेश सोनवणे, मुख्य प्रवक्ता योगिनी पगारे, आदिना शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे ताब्यात घेण्यात आले असून, या जुलमी हिटलर शाही सरकार ची तानाशाही ला आजाद समाज पार्टी व भिम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आजाद यांच्या स्टाईल ने ए एस पी रस्त्यावर उतरून रास्ता ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन व रास्ता रोको करेल जाणीवपूर्वक चैत्यभूमी ला आलेल्या जनतेची ससेहोलपट जी उत्तर मनपा विभाग दादर प्रशासनाने जी बौद्ध अनुयायीना
जनावाराप्रमाणे वागणूक दिल्याबद्दल आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो सरकारणे आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये अन्यथा रास्ता रोको करणार असा सूचक इशारा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिला आहे
Tags
news
