(श्री.प्रभाकर आडगाळे.) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे तब्बल पाच महिणा झालेत परंतु अध्याप बॅंकेत पैसे पडलेनाहीत म्हणुन जेष्ठनागरिक,श्रावणबाळ योजनाचे लाभार्थी देखील चिंतेत आहेत जिवन जगायचे कसे ,औषधपाण्यासाठी हातात पैसे नाहीतअशी व्यथा निर्भिडन्युज प्रतिनिधी बोलतांना सांगितली. काही जेष्ट नागरिकांनी महर्षी वाल्मिक मंदिरात सभा आयोजित केली होती. श्रीराम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.भगवान माणिक कोळीसांगितले. जुन महिण्यापासुन तर आज बावीस आॅक्टोबर महिणा संपण्याचा मार्गावर आहे अध्याप बॅंकेत पैसे पडले नाहीत लाभार्थी चिंतेत आहेत दसराला देखील पैसे नसल्यामुळे नाराजी व्यक्त करित आहेत. तरी मेहरबान तहसिलदार साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घेवुन सदर योजनांचे पैसे बॅंक खातेवर टाकण्याची विनंती करित आहेत दिवाळी तरी गोड होईल अशी आशा बाळगतो.
Tags
news