धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिल 2021 पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्यासह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर- मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), यावल वन्यजीव अभयारण्यात (जळगाव) 30 एप्रिल 2021 पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
Tags
news
