शिरपूर - उद्या मतमोजणी असून विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही. *सध्या जिल्ह्यात कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा अमल चालू आहे.आपले गावात DJ किंवा साउंड बॉक्स/बँड लावून मिरवणूक काढणे,उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत/घरासमोर जाऊन फटाके वाजवणे,गुलाल उधळणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत.जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून दोन्ही गटात भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास.सर्वस्वी उमेदवार व पॅनल प्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.* त्यासाठी सर्व उमेदवार व पॅनल प्रमुख यांना अगोदरच कलम 149 फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत.
तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील मोठ्या मनाने पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. *त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात मदत करावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असते. त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची पॅनल प्रमुख/विजयी उमेदवार/पराभूत उमेदवार यांनी दक्षता घ्यावी ही अशी विनंती व सूचनहेमंत पाटीलपोलीस निरीक्षक शिरपुर शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहेे.
Tags
news