शिरपूर - केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन सुधारित कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे यात प्रामुख्याने शेतीमाल विक्री कायदा 2020, कंत्राटी शेती कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा 2020, विज विधेयक 2020 हे सर्व कायदे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज देशभरात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांना समर्थन देण्यासाठी शिरपूर तालुक्यातून किसान संघर्ष समन्वय समिती व त्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना आणि इतर समविचारी पक्षांनी यास पाठिंबा दिला होता म्हणून आज किसान संघर्ष समन्वय समितीने शिरपूर बंदची हाक दिली होती. सदरच्या बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला असून या संघटनांच्या मोर्चा जाऊन निवेदन देणे पर्यंत व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवली होती. यानंतर मात्र व्यवहार सुरळीत झाले. शेतकऱ्यांच्या मागणी मध्ये प्रामुख्याने सदर कायद्यामध्ये हमीभावापेक्षा कमी किमतीला शेतमाल खरेदी करता येणार नाही असे बंधन असणे आवश्यक असावे, शेतमालाला आधारभूत किंमत मिळालीच पाहिजे, शेतमाल विकत घेणारे व्यापारी कोण व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी सुरक्षा मिळणे देखील आवश्यक आहे ,म्हणून असे कायदे तयार करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात यावे ,आणि जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्याला न्यायालयात दाद मागण्याची तरतूद करण्यात यावी इत्यादी सुधारणा करून देशातील कृषी उत्पन्न बाजार समितीची अस्तित्व देखील कायम राहावे या मागणीचे निवेदन आज शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले .यासाठी आज विजय स्तंभ शिरपूर येथून समन्वय समितीने कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत उपविभागीय कार्यालय येथे जाऊन शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. यावेळेस या समन्वय समितीच्या समर्थनात तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर ,मनोज महाजन, एडवोकेट हिरालाल परदेशी ,एडवोकेट संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश करकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत ,शिवसेनेचे राजू टेलर ,शिवसेना शहराध्यक्ष मनोज धनगर, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे, काँग्रेस पक्षाचे उत्तमराव माळी, शेतकरी संघटनेचे मोहन पाटील ,एडवोकेट गोपाल राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष युवराज राजपूत, हेमराज राजपूत ,यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधव या वेळेस उपस्थित होते याप्रसंगी मोदी सरकारच् च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केंद्र सरकार आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Tags
news
