नाशिक्र जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक-:कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर अटी व नियमांच्या अधी राहून शासनाने एस.टी.बस प्रवास वाहतुक सुरु केली आहे.मात्र खाजगी वाहनांना आंतरजिल्हा प्रवासाकरीता ई पास ची सक्ती करण्यात आली असून ई-पास ची सक्ती अन्यायकारक आहे. राज्य शासनाने ही ई-पाससी सक्ती रद्द करावी, मार्च च्या मध्यापासून टप्प्याटप्याने राज्याची एस.टी.वाहतूक बंद करण्यात आली.मध्यंतरी एस.टी.ची जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. मर्यादीत 22 प्रवासांच्या वाहतुकीसाठी दिल्या गेलेल्या परवानगी अंतर्गत ही पुरेशी प्रवासी उपलब्ध न झाल्याने राज्यातल्या अनेक आगारातल्या अनेक फेऱ्या बंद केल्या गेल्या.तथापी गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने एस.टी.तून आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी अभिनंदनीय निर्णय घेतला.सोशल डिस्टनिंगचे आणि लॉकडाऊनचे नियमांचे बंधन एस.टी.लाही घातले असले तरी या एस.टी.तून केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी ई-पासची सक्ती घातली गेली नाही. मात्र राज्यातल्या खाजगी प्रवासी वाहतूकीसाठी ई पास बंधन अन्यायकारक वाटू लागले आहे. तरी आंतरजिल्हा खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी एस.टी.प्रमाणेच ई पासचे बंधन रद्द
करण्यात यावे. राज्य अंतर्गत आणि आंतरराज्य प्रवासी आणी मालवाहतूकीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे आणि राज्यानेही याचे अंमलबजावणी करण्याचे सूचित केल्याचे पार्श्वभुमीवर राज्यातल्या स्वत:चे अथवा खाजगी गाड्यातून प्रवासी वाहतूक सोशल डिस्टनिंग आणि लॉकडाऊनचे नियम लावून तसेच प्रवासी मर्यादीची नियमावली जाहिर करून जाचक ई-पासची अट करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मुस्लिम शाह छप्परबंद सोशल फाउंडेशन मनमाड च्या वतीने सर्कल कैलास चौधरी साहेब यांना देण्यात आले आले या वेळी शहराध्यक्ष अल्ताफ़ शाह, उपाध्यक्ष राजू शाह, रफत कादरी, खजिंनदार नदीम शाह, कार्याध्यक्ष पापा शाह, सहसचिव इरफान शाह, आफताब शाह, रईस शाह,नईम शाह,व अन्य पधाधिकारी उपस्थितीत होते
Tags
news
