शिरपूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांच्या आतील कर्ज असणार्या थकबाकीदार शेतकर्यांना कर्ज माफ जाहिर केले आहे मात्र तालुक्यातील अनेक शेतकर्यांना अद्याप या योजनेचा लाभ झाला नाही. मात्र या योजनेत ज्या शेतकर्यांना लाभ झाला आहे त्यांना व न लाभ झालेल्या शेतकर्यांना नविन खरिप हंगामासाठी आतापर्यंत पिक कर्ज न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये अस्वस्थता असुन तालुक्यातील महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्ज माफ झालेल्या व न माफ माफ शेतकर्यांना ही तात्काळ पिक कर्ज मिळावे अशी मागणीचे निवेदन आ. काशीराम पावरा, भाजपा धुळे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा शिष्टमंडळाने तहसिलदार आबा महाजन यांची (दि.29. मे) रोजी भेट घेवुन दिले आहे. निवेदनावर जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डाॅ. मनोज निकम, सामाजिक कार्यकर्ते शामकांत ईशी, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, नरेश पवार, प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रविंद्र सोनार, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, माजी शहर सरचिटणीस सुनिल चौधरी, सतिष गुजर कुवे, अविनाश शिंपी, हिरालाल कोळी, विनायक कोळी, अल्पसंख्यक मोर्चा शहराध्यक्ष अरमान मिस्तरी आदिंच्या सह्या आहेत. निवेदनात पुढे नमुद केले आहे कि देशासह जगात कोरोना विषाणुने थैमान घातलेले आहे त्यामुळे जिल्हासह देशभरात गेल्या दोन ते अडीच महिन्यापासुन लाॅकडाऊन सुरु आहे. धुळे जिल्हात ही कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणात आढळुन आलेले आहेत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढतच आहे अशा परिस्थितीत अजुन किती दिवस कोरोनामुळे जिल्हात लाॅकडाऊन राहिल याची काही ही शाश्वती नाही लाॅकडाऊनमुळे शेतकर्यांचे पुरते कंबरडे मोडले गेलेले आहे. शेतकर्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे ते उत्पादन विकले जात नाही. अजुनही शेतकर्यांच्या घरात कापुस, मका, ज्वारी, बाजरी पडुन आहे तसेच कांद्याला भाव नाही, भाजीपाला विकला जात नाही. फळांना मागणी नाही अशा संकट काळात शेतकरी हैरान झालेला आहे. अश्या वेळी खते, बी-बियाणे व मजुरीसाठी शेतकर्यांना कर्ज कामात येते. शेतकर्यांनी महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातुन मार्च पर्यंत कर्ज परत केलेले असतांना ही त्यांना कुठला ही पिक कर्ज पुरवठा केला जात नाही. तरी बॅकेने संकट काळात शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे याची तहसिलदार यांनी दखल घ्यावी व महात्मा फुले कर्ज मुक्त योजनेत लाभ झालेल्या शेतकर्यांना व न लाभ झालेल्या शेतकर्यांना ही तात्काळ पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्जमुक्त व न झालेल्या शेतकर्यांनाही तात्काळ पिक कर्ज द्यावे :भाजपा
byMahendra Rajput
-
0
