मुकटी -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जारी केला असून,त्यात चौथा टप्प्यातील लॉकडाऊन हा ३१ मे पर्यन्त असल्याने, आदिवासी, गरीब,गरजू,विधवा,अशा हातमजुरी करणाऱ्या लोकांचा व्यवसाय बंद असल्याने आपला उदरनिर्वाह करायचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत,
याच पार्श्वभूमीवर मुकटी येथील युवक चंद्रकांत सैंदाणे व मुकेश मैन यांनी कासविहिर गावात जाऊन गरीब व गरजू लोकांना १०० किलो तांदूळ वितरित केले,त्यांना राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्रा,डॉ,डी, आर पाटील व चेतना पिले यांचे सहकार्य लाभले,
