धुळे - मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत उन्नत भारत अभियान संपूर्ण भारतात राबविले जात आहे. आय. आय. टी. दिल्ली या मुख्य संस्थेच्या मार्गदर्शनाखा ली सर्व उच्च शिक्षण संस्था काम करीत आहेत. या मिशन साठी श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित धुळे येथील एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां नी अजंग गावात सर्वे केला.
अभियांत्रिकी महाविद्यालयात उन्नत भारत अभियान सेलची स्थापना प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्या त आली. या सेलचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रा.मोहम्मद जुनेदुद्दीन आहेत,. यात सिव्हिल , इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्पुटर तसेच इन्फॉर्मशन टेकनॉलॉजिच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयाने एकूण ५ गावे दत्तक घेतली आहेत.
इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अजंग गावात जाऊन सर्वे केला. यावेळेस गावातील एकूण ६५ घरांचा सर्वे केला. त्यात गावातील समस्या जाणून घेतल्या. त्यात शुद्धपाणी, स्वच्छता, सोलर एनर्जी तसेच कचरा व्यवस्थापन नियोजनासाठी काय उपाय योजना करता येतील या संदर्भात ग्राम सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थांनी घराघरात जाऊन दिली. ग्राम सभेत अजंग गावाचे सरपंच सौ.सुनंदाबाई माळी, माजी सरपंच डॉ. दिनेश माळी, मुख्याध्यापक दिलीप पाटील, सचिन माळी तसेच या सेलचे को-ऑर्डिनटर प्रा. मोहम्मद जुनेदुद्दीन , मनोज सोनार, उपस्थित होते .योगेश चौधरी, राहुल ठाकूर, दिग्विजय देवरे, रवींद्र बडगुजर यांनी सहकार्य केले.
या कार्याबद्दल विद्यार्थी व प्राध्यापकांचे एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, ट्रस्टी तपनभाई पटेल, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पसचे सल्लागार डॉ. अजय पसारी, धुळे कॅम्पस चे डायरेक्टर डॉ. के .बी. पाटील, प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे आदींनी कौतुक केले.
Tags
news