शिरपूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास : नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न*
*शिरपूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंदन आबा फाऊंडेशन, गंगाई चिल्ड्रेन हॉस्पिटल, नेताजी परिवार व युथ फ्रेंड सर्कल, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले.*
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी-संध्याकाळी रस्त्यावर ये-जा करणारे नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका, अपघात तसेच मानसिक तणाव निर्माण होत आहे.
*हा प्रश्न केवळ त्रासाचा नसून सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नगरपालिकेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी निर्णय घ्यावेत व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.*
.jpg)