*लेख - ४ फेब्रुवारी : कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस*
*संसदरत्न पुरस्काराचे मानकरी --खासदार डॉ.श्रीकांत शिंदे*
लेखक-रणवीरसिंह राजपूत*,
सदस्य,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,ठाणे
(मो.न.९९२०६७४२१९)
*शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण
नगरीचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस*.यानिमित्त श्रीकांतदादांना ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोकांतर्फे हार्दिक शुभेच्छा! श्रीकांतदादांना राजकीय,सामाजिक, व वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश लाभो,ही आई
जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
उच्चविद्याविभूषित,बुद्धिमान,
कर्तव्यदक्ष,प्रामाणिक,
एकवचनी,धाडसी,राजबिंडा,
लोकाभिमुख दृष्टी लाभलेला अन् हिंदुत्वाची कास धरून राजकारणातून समाजकारण करणारा*
*व्रतस्थ लोकनेता* असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
खासदारच्या रूपानं कल्याण -डोंबिवलीवासियांना लाभलं,ही जनमानसाच्या दृष्टीने मोठी भाग्याची गोष्ट आहे.अत: तो भाग्याचा दिवस उजाडला.साताऱ्याच्या शिंदे घराण्यात ४ फेब्रुवारी १९८७ रोजी सौ.लताताई एकनाथजी शिंदे या समाजसेवी मातेच्या उदरी एक तेजस्वी पुत्र जन्मास आला. त्याचं नाव "श्रीकांत!"
शालेय जीवनापासूनच डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याचं स्वप्न श्रीकांत दादांनी पाहिलं होतं.कारण त्यांच्या मते, "रुग्णसेवा हाच खरा डॉक्टरचा धर्म असतो". या
स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी खूप अभ्यास करून मोठं होण्याचा दृढनिश्चय केला. योगा-योगाने श्रीकांतदादांनी शालेय जीवनात घवघवीत यश प्राप्त केलं.१२ वीत सर्वाधिक गुण मिळाल्याने पिताश्री एकनाथजी शिंदे यांनी श्रीकांतला नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं.डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करायची,हे ध्येय मनाशी बांधून दादांनी खूप मेहनत घेतली.त्याची परिणती म्हणजे दादांचे भाग्य उजळले.आधी ते एम.बी.बी.एस. झाले.त्यानंतर त्यांनी एम.एस.(आर्थो)ही पदव्युत्तर डिग्री मोठ्या गुणांनी संपादन केली.त्यामुळे दादांचे सर्वत्र कौतुक झाले.श्रीकांतदादा हे शालेय जीवनापासून अभ्यासू व हुशार असल्याने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होतच गेली.
तथापि, समाजसेवेसाठी केवळ डॉक्टर होऊन चालणार नाही,तर त्यासाठी त्याला राजकारणातून समाजकारण करण्याची जोड देण्याचे त्यांनी निश्चय केला. या पार्श्वभूमीवर धर्मवीर आनंद दिघेसाहेब आणि एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय
बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे श्रीकांतदादांचा राजकारणात येण्यासंदर्भाचा विषय मांडला.त्याची दुर्दम्य इच्छा अन् उच्च शिक्षण पाहून त्याला बाळासाहेबांनी संमती दर्शविली.अन् लगेच शिवसेनेमार्फत डॉ.श्रीकांत शिंदे यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत
कल्याण मतदारसंघाचे तिकीट देण्यात आलं.त्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद परांजपे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला अन् ते १६ व्या लोकसभेतील सर्वाधिक तरुण खासदार म्हणून
नावरूपाला आले.त्यावेळी ते एम.एस.च्या फायनल इअरला होते.म्हणजे एकीकडे मेडिकलचा अभ्यास अन् दुसरीकडे निवडणूक धुमश्चक्री ह्या गोष्टी त्यांनी नियोजनबद्धरित्या पार पाडून दोन्ही ठिकाणी बाजी मारली. श्रीकांतदादांनी खासदार होताच रुग्णसेवा अन् नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं यावर विशेष भर दिला.
श्रीकांतदादांनी लोकोपयोगी कामे करून मतदारांचा विश्वास जिंकला.याची परिणती म्हणजे *श्रीकांतदादा हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून येऊन आपले प्रतिस्पर्धी बाबाजी पाटील यांचा दारुण पराभव केला*.अन् त्यांनी १७ व्या लोकसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे समाजातील गोरगरीब,निराधार लोकांच्या आरोग्य,शिक्षण,रोजगार व आवास या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र मेहनत घेतल्याने शिंदे पिता-पुत्राला राजकीय क्षेत्रात मोठं यश संपादन करता आलं.वास्तवात हीच त्यांच्या यशाची खरी पावती आहे.
मध्यंतरीच्या काळात रेल्वे मंत्रालयाने कल्याण- डोंबिवली रेल्वे लाईन लगतच्या हजारो झोपड्या पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुमारे तीन-चार दशकांपासून राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांची घरं नष्ट होणार होती.परिणामी त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येणार होती.पण म्हणतात ना " *भगवान के घर देर है, अंधेर नही* हे सिद्ध झाले.कल्याणचे तरुण तडफदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जणू
देवदूततासारखे धावत आले. त्यांनी *आधी पुनर्वसन व नंतर निष्कासन* हा मुद्दा प्रकर्षाने मांडून ही कारवाई थांबविली.वास्तवात खासदारसाहेबांचा हा नैतिक विजयच म्हणावा. या पार्श्वभूमीवर हजारो झोपडीवासियांनी दादांचे आभार मानून त्यांना अंत:करणापासून अनंत दुवा दिल्या.वास्तविक पहाता,दादा हे केवळ डॉक्टरच नव्हे तर,सच्चे मानवतावादी लोकनेतेही आहेत,हे दृष्टोत्पत्तीस येते.
*जिसका कोई नही,उसका भाई-दादा होता हैं* या तत्त्वानुसार कोटा,राजस्थान येथे
राज्यातून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने एस.टी.बसेसची व्यवस्था करून देत,खासदार साहेबांनी त्यांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपापल्या जिल्ह्यात रवाना केलं.त्याप्रमाणेच दिल्ली येथे अडकलेल्या *महाराष्ट्रातील यू.पी.एस.सी.च्या उमेदवारांची* श्रीकांतदादांनी रेल्वेमंत्र्यांना विनंती करून परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली.इतकेच नव्हे तर,सदर उमेदवारांचे मध्यरात्री चक्क २ वाजता कल्याण स्टेशनवर स्वागत करण्यास
श्रीकांतदादा हे जातीने हजर होते.याला म्हणतात खरी *समर्पणवृत्ती* म्हणतात. या विविध संकटमय प्रसंगी खासदारसाहेबांनी केवळ आपल्या
मतदारसंघाचा विचार न करता,साऱ्या महाराष्ट्राला कोरोना काळात मदतीचा हात दिला.वास्तवात हीच खरी श्रीकांतदादांची राजकीय प्रगल्भता आहे.
बंधू-भगिनींनो,केवळ कल्याण लोकसभा मतदार संघालाच नव्हे तर,संपूर्ण ठाणे जिल्ह्याला श्रीकांतदादांच्या रुपात एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभले आहे.हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पिताश्री एकनाथजी शिंदे अन् मातोश्री सौ.लताताई शिंदे यांनी किती कठोर परिश्रम घेतले व अडीअडचणींना तोंड दिले,याची कल्पना करवत नाही.साताऱ्याहून आपले आईवडील अन् पोराबाळांना घेऊन एकनाथजी आपले नशीब अजमविण्यासाठी ठाण्यात दाखल झाले.रिक्षा चालक व नंतर ठाणे रिक्षा युनियनचा अध्यक्ष म्हणून जीवन प्रवास सुरू केला.परिवाराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत, शिंदेसाहेबांनी १०वीनंतर शिक्षण अर्धवट सोडून, श्रीकांतदादांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं.दरम्यान एकनाथजींची योगायोगाने धर्मवीर आनंद
दिघेसाहेबांच्या संपर्कात आले.अन् पहाता पहाता,प्रगतीची चक्रे फिरू लागली. खरं तर,
शिंदेसाहेबांची निष्ठा,कठोर परिश्रम अन् गोरगरिबांसाठी काम करण्याची मानसिक तयारी या गुणवैशिष्ठेंमुळे शिंदे पिता-पुत्राचा ठाणे जिल्ह्यावरील राजकीय दबदबा अधिक मजबूत होत असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.
दरम्यान आई जगदंबेच्या कृपेने श्रीकांतदादांनी नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमधून आधी एम.बी.बी.एस.अन् नंतर एम.एस.(आर्थो) या वैद्यकीय क्षेत्रातील पदव्या संपादन केल्या. वास्तवात,त्यातून मुलाची महत्वाकांक्षा सिद्धीस आली,तर आईवडिलांचे स्वप्न साकार झाले.दादांना डॉक्टर झाल्याचे पाहून पालकांचा आनंद गगनात मावत नव्हता.जणू त्यांना आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं.
"प्रयत्नांती परमेश्वर" हा विचार भाई अन् दादांनी
सिद्धीस आणला,याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
*हर कामियाब इंसान के पिछे औरत का हाथ होता है* हे श्रीकांतदादांच्या बाबतीत खरं ठरलं आहे.त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वृषाली शिंदे ह्या नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात.महत्वाचे म्हणजे चिरंजीव कु.रुद्रांश याचे स्मित हास्यही दादांना प्रोत्साहित करत असत.कु.रुद्रांश देखील मोठा झाल्यावर राजकारणात उतरून मोठं पदग्रहण करेल,असे उबाठाचे प्रमुख भाकीत व्यक्त करतात.*उनके मुहं मे घी शक्कर!*
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या आशिर्वादाने तर,धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या प्रेरणेतून भाई अन् दादांची राजकीय,सामाजिक अन् आध्यात्मिक जडणघडण झाली.समाजातील शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून राज्यातील गोरगरीब,निर्धन,गरजू लोकांचे महागडे ऑपरेशन्स मुंबई,ठाणे,पुणे येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये मोफत वा अल्पदरात व्हावेत,यासाठी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन अन् शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे हातात हात घालून रुग्णसेवेचं काम मोठ्या तत्परतेने करत आहेत.स्वतः श्रीकांतदादा हे निष्णात डॉक्टर असल्याने अन् त्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याने श्रीकांतदादा हे रुग्णसेवेचं कार्य तनमनधनाने करत आहेत.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार डॉ.श्रीकांत शिंदे मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारहून अधिक महाआरोग्य शिबिरे राज्यात आयोजित करून त्याचा लाखों लोकांना लाभ मिळाला आहे,ही स्तुत्य बाब आहे.महत्वाचे म्हणजे
अपघाती व दुर्भर रोगांच्या रुग्णांची रक्ताची गरज भागविण्याच्या उद्देशाने जागोजागी रक्तदान शिबिरे आयोजित केली,जेणेकरून रक्ताचा तुटवडा भासू नये अन् अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या जीवाला रक्ताअभावी धोका पोहोचू नये.
मध्यंतरित श्रीकांतदादांनी महाड दुर्घटनेत मरण पावलेल्या कुटुंबियांच्या दोन मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.त्यांच्या नावे बँकेत प्रत्येकी १० लाख रुपये मुदत ठेवीत ठेवले.तसेच कु.नमन शिंदे या एका वर्षाच्या मुलाला तातडीने ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.अन् त्याच्या हृदयाचे ऑपरेशन करून त्याला
नवजीवन दिलं.संकटप्रसंगी धावून जाऊन मदतीचा हात देणं,ही बाळासाहेब ठाकरे अन् आनंद दिघेसाहेब यांची शिकवण आत्मसात करून त्यांनी संकटाची पर्वा न करता पीडितांना वेळीच मायेचा आधार दिला आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोना काळात खासदारसाहेबांनी *चेस द व्हायरस* या मिशनखाली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुमारे ४५ झोपडपट्ट्या कोरोनामुक्त केल्या.वास्तवात हीच खरी डॉक्टरसाहेबांच्या वैद्यकीय ज्ञानाची फलश्रुती आहे.इतकेच नव्हे तर, श्रीकांतदादांच्यावतीने कल्याण लोकसभा
मतदारसंघातील सुमारे ५५ हजारहून अधिक रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले.त्यातून लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला.या सर्व गरजू लोकांना
डॉ.श्रीकांतदादांचे शतश: आभार मानले.
महत्वाची गोष्ट म्हणजे लॉकडाऊन काळात कामधंदे बंद असल्याने सफाई कामगार, शेतमजूर,हातगाडीवाले,
हमालमापाडी,लहानसहान व्यवसाय करणारे दिव्यांग स्त्री-पुरुष,घरकाम करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी समाज घटकांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले,त्यामुळे त्यांच्या पोटाची खळगी भरून निघाली. याशिवाय श्रीकांतदादांकडून मास्क,सेनिटायझर आदी साहित्याचेही वाटप करण्यात आले,ज्यातून त्यांचा कोरोनाच्या संसर्गपासून बचाव होऊ होण्यास मदत झाली.याशिवाय डॉक्टरसाहेबांनी रस्त्यावर उतरून थेट कोरोनाशी लढा देणाऱ्या फ्रंटियर्स पोलीस,पत्रकार,सफाई कामगार यांची जागीच कोरोना चाचणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते वैद्यकीय साहित्य वाटप केले.दरम्यानच्या काळात डॉक्टरसाहेबांनी लोकांच्या जिवांच्या रक्षणासाठी कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोविड १९ च्या टेस्टींग लॅब उभारल्या.वास्तवात श्रीकांतदादा हे खऱ्या अर्थाने रुग्णदुत तर आहेतच,त्याबरोबर ते मानवतावादी विचारसरणीचे लोकनेतेही आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली *बाळासाहेबांची शिवसेना* ही मोठ्या जोमाने लोकहितार्थ निर्णय घेत आहे.त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू लागले,ही स्वागतार्ह गोष्ट आहे."विरोधकांच्या टिकेला टिकेने उत्तर न देता,कामांतून उत्तर द्यायचे",या शिंदेसाहेबांच्या संदेशाचे पालन करून श्रीकांतदादांनी आपली पुढील राजकीय वाटचाल केली आहे. दुसरीकडे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन ह्या दोन्ही सेवाभावी संस्था मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेसर यांच्याशी समन्वय साधून राज्यातील गोरगरीब लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून वैद्यकीय मदत मिळवून देताहेत.शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दीड वर्षात सुमारे १५,००० गोरगरीब लाभार्थ्यांचे महागडे ऑपरेशन्स होऊन त्यांना १२५ कोटी रुपयांहून जास्तीचे
अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले.श्रीकांतदादांनी याचे श्रेय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.यातून दादांची खिलाडीवृत्ती प्रतिबिंबित होते.
श्रीकांतदादांना फुटबॉल खेळण्याची खूप आवड आहे.या पार्श्वभूमीवर त्यांची *ठाणे फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष* म्हणून निवड करण्यात आली.उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभेच्या विविध विषयांवर आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या "खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील ४४८ सदस्यांमधील पहिल्या पाच सदस्यांत निवड" झाल्याचे लोकसभा अध्यक्षांनी जाहीर केलं.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.
ठाणे जिल्ह्यात असलेल्या बहुतांशी रेल्वे स्टेशनांवरील स्वयंचलित जिने,पादचारी पूल,रेल्वेपूल,लिफ्ट,सॅटिक,
उड्डाणपूल आदी प्रकल्प प्रवाशांच्या
सोयीसुविधांसाठी खासदारसाहेबांच्या प्रयत्नातून उभारले गेलेत.याशिवाय प्रवाश्यांना कमी दरात शुद्ध पाणी मिळावे व त्यांची तहान
भागावी,या उद्देशाने रेल्वे स्थानकांवर *वॉटर डिस्पेन्सर* सुरू केलेत. त्यामुळे लांबून येणाऱ्या
प्रवाश्यांची तहान भागने सुकर झाले आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचे ठळक उदाहरण म्हणजे कल्याण येथील "ऐतिहासिक
पत्रीपुलाचे
पुनर्निर्माण" होय.कोरोनाची तमा न बाळगता,श्रीकांतदादा हे लॉकडाऊनच्या काळात हैद्राबाद येथे जाऊन गर्डर निर्मितीची पहाणी करायचे.अखेर खासदार साहेबांच्या अथक प्रयत्नांतून हैद्राबाद येथून गर्डर पाठविण्यात आले अन् १०४ वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालिन पत्रीपुलाचे नूतनीकरण होऊन त्याचे लोकार्पणही झाले.परिणामी वर्षानुवर्ष नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा
मिटला.दळणवळणची उत्तम सोय झाल्याबद्दल कल्याण,डोंबिवली,
उल्हासनगर आदी उपनगरांतील नागरिक व वाहनचालकांनी भाई-दादांचे शतश:आभार मानले.विशेष म्हणजे यासंदर्भात राजकीय विरोधकांचे तोंड कायमचे बंद झाले.*आधी करून दाखवतो,नंतर बोलतो*, हे शिवसेनेचं ब्रीद दादांनी कृतीने सिद्धीस आणले.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची अभ्यासूवृत्ती,विविध विषयांची अनुभूती,गोरगरीब लोकांच्या आरोग्याबद्दल कणव,वैद्यकीय ज्ञान,सकारात्मक विचारसरणी,भाषांवरील प्रभुत्व या गुणवैशिष्ट्यांचा विचार करून त्यांची विविध केंद्रीय कमिटींवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यात सदस्य स्टंन्डिग कमिटी,आरोग्य/ कुटुंब कल्याण ; सदस्य,गृह निर्माण/नागरी व्यवहार; सदस्य,संरक्षण/डिफेन्स; सदस्य,कमिटी ऑफ व्हायलेशन ऑफ प्रोटोकॉल नोर्मस ऑफ गवर्नमेंट ऑफिसर्स विथ लोकसभा मेंबर्स यांचा समावेश आहे.दादांची *वर्क इज वर्शिप* ही विचारसरणी त्यांच्या यशाचे खरं गमक आहे.
कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गजन्य आजारांशी समर्थपणे मुकाबला करणे शक्य व्हावे,यादृष्टीने शिक्षणासह *स्वास्थ्य* या विषयावर राज्य सरकार व केंद्र सरकारने प्राधान्य देणे काळाची गरज आहे,असे मत खासदारसाहेबांनी लोकसभेच्या अधिवेशनात व्यक्त केले.कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर *इंडियन फार्मासिट्युकल सेक्टर* या महत्वपूर्ण क्षेत्राला अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे,याची त्यांनी लोकसभेत स्पष्टोक्ती केली.त्यामुळेच त्यांना
*रुग्णदुत* ची उपमा दिली जाते.
अंबरनाथ येथील प्राचीन काळातले *शिव मंदिर* आणि आसपासचा परिसराचे
सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले असून,अंबरनाथ हे *टेंपल सिटी* म्हणून विकसित करण्यात शिंदे पिता-पुत्राला यश आलं आहे. कारण राजकीय इच्छा शक्ती अन् त्याला जोडून हिंदुत्वाची पवित्र भावना.त्यास केंद्रीय पुरातत्व विभागाची मंजुरी मिळून त्यासाठीचा निर्धारित निधीदेखील मंजूर झाला. आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जागतिकस्तरावर ह्या शहराची ओळख व्हावी,या उद्देशाने हे
तिर्थक्षेत्र विकसित करण्यात आले आहे.मागील वर्षी शिव मंदिराच्या पवित्र प्रांगणात डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे *शिव मंदिर आर्ट फेस्टिवल* चे आयोजन करण्यात आले होते.आता हे शिवभक्ती स्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून
नावरूपाला आले असून,ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जाईल,हे निश्चित!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी
महाराजांच्या *दुर्गे गुर्गेश्र्वर किल्ले रायगड* येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अखंड पुष्पहार अर्पण करण्याचा पायंडा पाडण्याचा मान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना जातो.आज या उपक्रमास तीन वर्षे पूर्ण होत आले आहेत.या अद्वितीय संकल्पनेची छत्रपती संभाजी महाराज यांनी श्रीकांत शिंदे अन् मंगेश चिवटेसरांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.या उपक्रमामुळे
शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला,याचा आम्हा भूमिपुत्रांना सार्थ अभिमान आहे.
याशिवाय अंबरनाथ-बदलापूर दरम्यान राहणाऱ्या चाकरमान्यांची प्रवास सेवा सुखकर व्हावी,या उद्देशाने खासदारसाहेबांनी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करून *चिखलोली* स्थानक उभारण्याचा दादांचा मानस असून तो पूर्ण होईलच.खासदारसाहेबांच्या प्रयत्नातून *एरोली-काटई मार्गे उन्नत मार्गाच्या बोगद्याचे* काम प्रगतीपथावर आहे.सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्प
एमएमआरडीएमार्फत कार्यान्वित होत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा अन् नवी मुंबई येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न बहुतांशी मार्गी लागेल,असा विश्वास
कार्यसम्राट डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कार्यालय २४ तास चालू ठेऊन जातपात,धर्म,पंथ अन् राजकीय अभिनिवेश न बाळगता,ठाणे जिल्ह्यासह राज्यातील समस्त नागरिकांना मदतीचा हात दिला.डॉक्टरसाहेबांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाचे *एथिक्स* पाळून संकटसमयी आपल्या जीवाची पर्वा न कोरोनाग्रस्त लोकांचे प्राण वाचविले.दरम्यान
श्रीकांतदादांना दोन वेळा कोरोनाची लागणही झाली.तथापि त्याची तमा न बाळगता,कोरोनातून बरे झाल्यावर *तू रणांगणातला वीर..सोडू नकोस धीर..* या पार्श्वभूमीवर त्यांनी कोरोना विरुद्धचा लढा पुढे अविश्रांत चालूच ठेवला. हे तर त्यांच्या *क्षत्रिय बाणा* चे खरे लक्षण आहे.
श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदार संघांमधील ५६ गावातील ५१ हजार कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न *जलजीवन मिशन* योजनेंतर्गत सोडवून दिला.या योजनेची किंमत सुमारे ६५ कोटी एवढी आहे.घरोघरी पाण्याची सोय झाल्याने येथील ग्रामस्थांनी दादांचे मनस्वी आभार मानले. या अन् अशा अन्य लोकोपयोगी कामांच्या आधारावर खासदारसाहेबांना यंदाचा *संसदरत्न* पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे युवा नेते या भूमिकेतून त्यांनी शिक्षण,क्रीडा,रोजगार,युवा कल्याण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल झी युवा वाहिनीने खासदारसाहेबांना *युवा नेतृत्व सन्मान पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने ना.एकनाथजी
शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे येथील सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दरवर्षी *राज्यातील गोरगरीब लोकांच्या पाल्यांचे हृदयाच्या छिद्रांचे मोफत ऑपरेशन करून देण्यात येतात.आज मितीपर्यंत अशा सुमारे ४००० हून अधिक मुला-मुलींच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या अन् आज ही निरागस मुलं-मुली निरोगी जीवन जगत आहेत.हे सत्कर्म म्हणजेच राजकारणातून समाजकारण करण्याचे द्योतक आहे.परिणामी हजारो गोरगरीब पालकांकडून शिंदे
पिता-पुत्रावर आशिर्वाद-दुवा-शुभेच्छांचा वर्षाव झाला.वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून श्रीकांतदादा लोकसेवेचं व्रत तनमनधनाने पुढे चालवत आहेत,हेच खऱ्या अर्थाने *आदर्श लोकनेता* असल्याचं प्रतिक आहे.सन्माननीय खासदारसाहेबांची राजकीय-सामाजिक - वैद्यकीय क्षेत्रांत उत्तरोत्तर प्रगती होवो,ही सदिच्छा आम्ही ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोक व्यक्त करतो.
जय भारत 🇨🇮जय हिंद!
जय🚩महाराष्ट्र!
डॉ.श्रीकांतजी शिंदे इनके लिये....."मंजिले उन्हीको मिलती है,जिनके सपनों में जान होती है"
"पंख से कुछ नहीं होता,हौसलों में उडान होती हैं"

