काल रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध ! मुख्यमंञ्यांनी केले जाहिर



प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरही कोरोना बाधित रुग्णसंख्येत  प्रचंड वाढ होत आहे. यामुळेच कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात कठोर निर्बंध लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून नव्याने लागू करण्यात येणाऱ्या कठोर निर्बंधांबाबत माहिती दिली आहे. फक्त  रुग्णांची संख्या वाढत नाहीये तर  मृतकांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला लॉकडाऊनचं पाऊल उचलावं लागलं आहे.

काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार ???

 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये
गरजूंना शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत देणार
पेट्रोल पंप सुरू राहणार
हवाई वाहतूक, रेल्वे सेवा सुरू राहणार
सेबी, पेट्रोलियन, आयटी कार्गो सेवा सुरू राहणार
कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्येच कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी.

हॉटेल्स बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू
पार्सल सेवा सुरू राहणार

अति आवश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहणार.अत्यावश्यक आणि योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
अनावश्यक ये-जा बंद
15 दिवस संचारबंदी लागू राहणार
उद्या संध्याकाळपासून राज्यात संचारबंदी लागू
उद्या रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध
येत्या दिवसांत पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, हे मतदान झाल्यावर तेथेही कठोर निर्बंध लागू होणार.

निवृत्त डॉक्टर आणि नर्सेसला मदतीचं आवाहन
राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन, राजकारण करू नका.राज्यात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.लस दिल्यानंतर प्रतिकारकशक्ती येण्यासाठी काही दिवस जावे लागतात.जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे.
राज्यात ऑक्सिजनची आणखी गरज लागणार.
इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
राज्यातील एकही रुग्ण आणि मृत्यू लपवलेला नाहीये
सध्याची वेळ निघून गेली तर परिस्थिती आणखी बिकट होईल.राज्यात सध्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णांसाठी वापर.राज्यात बेड्स मिळत नाहीयेत, ऑक्सिजनचा आता तुटवडा निर्माण होऊ लागला आहे, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा निर्माण होत आहे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सुविधांवर भर पडला आहे.राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे
कोरोनामुळे परिस्थिती भयंकर झाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
क्षमतेपेक्षा अधिक भार पडल्याने चाचण्यांचे अहवाल येण्यास उशीर होतोय.कोरोना विरुद्धच्या लढाईला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे.राज्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कडक पावलं उचलण्याची वेळ आली आहे.नाईलाजाने काही बंधनं घालावी लागणार.विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला लॉकडाऊनचं पाऊल उचलावं लागलं आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने