नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून . नाशिक-:जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गांवध पैकी खोकरीपाङा येथें महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाच्या व ग्रामस्थ याच्या सहकार्यानेनुकतेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भुमी पुजन सोहळा संपन्न झाला डोंगर द-यात वसलेल्या अनेक समस्या पासून वंचित असलेल्या 40 घरांची वस्ती असलेल्या छोट्या पाड्यात अधिक मासाचे औचित्य साधून महाराष्टृ वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष व भजनी मंडळ एकत्र येऊन ग्रामस्थाच्या सहकार्यातून मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले.त्या प्रसगी अदिवासी,अज्ञानी समाजात प्रलोभन,अमिष दाखवून धर्मांतर केले जात आहेत ही बाब लक्षात येताच तालुका अध्यक्षांनी तमाम जनतेला एकत्र येवून हा जो काही घाट रचला जात आहे तो हानून पाडण्याचा ईशारा दिला आहे.आम्ही सर्व वारकरी एका वारकरी झेंड्याखाली एकत्र होऊन मोठी चळवळ ऊभारली जाईल .कार्यक्रम प्रंसगी श्रीह.भ.प.सिताराम बाबा,लक्ष्मण बाबा,किसन बाबा,नामदेव देशमूख,मोतीराम बाबा,गोपाळ बाबा,रमेश कुंभार,संजय भोये,चंद्रकांत गवळी,तुकाराम महाले,अहिरे भाऊसाहेब,शांताराम धुळे,पंडीत पागी,अशोक गवळी,सोमनाथ राऊत,लक्ष्मण टेलर,पखाणे भाऊसाहेब,गर्ज सर,पंचक्रोशितील भजनी मंडळ,सर्व ग्रामस्थ महीला मंडळ याची उपस्थीती लक्षणीय होती.
Tags
news
