अखंड देशवासीय ज्या कोरोनामुळे वैतागले आहेत,व सर्व स्तरावर आर्थिक संकट कोसळून मानवी जीवन दुःखाचा सामना करत असल्याने या देशातून कोरोना कायमस्वरूपी नष्ट व्हावा,व परत मानवी जीवनाला सुख,समृद्धी,शांती,वैभव असे गतवैभव प्राप्त व्हावे हा मानस घेऊन ब्रम्हचारी स्वामी निर्मलजी महाराज यांनी मुंबई सिद्धिविनायक मंदिर (भारत) पासून ते पशुपतीनाथ महादेव मंदिर काठमांडू (नेपाळ) पर्यंत अखंड पायी यात्रा करीत आहेत,काल दि.30 रोजी स्वामी निर्मलजी महाराज यांचे धुळे तालुक्यातील मुकटी येथील मुक्तेश्वर महादेव मंदिरात मुक्काम केला,यावेळी गौ. ग्राम यात्रा बहुद्देशीय सेवा समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री.अनिल मोरे,भरत साळुंके,नंदलाल साळुंके,तुकाराम पवार,दीपक साळुंके,दगडू सैंदाणे, योगेश सूर्यवंशी, गणेश चौधरी, डॉ.मनोहर निकम,रवी साळुंके,देविदास बडगुजर यांनी महाराजांचे स्वागत केले,
Tags
news
