स्वामी सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रेरित मालपुर श्रीराम मंदिर बस स्टॅंड विभाग येथे ठिक दुपारी दोन वाजता झाली.त्या प्रसंगी श्री.विजय बागल,जगदिश गोराणे,सुरेश पा. प्रविणसिंग गिरासे,कुणाल कांगणे,नयन सोनार,दिनेश बोरसे,रमेश चोधरी,भुषण पाटील, प्रभाकर पा.राजेंद्र कौठळकर,संजय गोसावी. राजेश सोनवणे,शरदतांबट,प्रकाश भावसार, रविंद्र भावसार,आदी ऊपस्थित होते.
प.पूआबासाहेब मोरे. यांचे शेती विषयी मार्गदर्शन केले ते म्हणाले कि जप व पंचमहायज्ञ करावेत दुखी पिडित व्यक्तींना दान करावे. मानव हा पृथ्वीवरआलेला पाहुणा आहे. त्याचे कार्य संपुन तो निघुन जातो. आज च्या कृर्षी महोत्सव कार्यक्रमात शेती विषयक महत्वाची माहिती अशी कि आज ची शेती ही विषारी बनत चालली आहे. म्हणुन जैवीक पद्धतीची शाश्वतशेतीची गरज आहे.पैसा हा एक माध्यम आहे स्वास्थ नाही. शेतीला जोडधंदा म्हणुन गावराणी (देशीगायी)पाळल्या पाहिजे. दुध, गवर्या, शेणखत इ.वस्तु मिळतात शेणखत हे शेतीस महत्वाचे आहे. स्वामी समर्थ केंद्र हे प्रत्येक गावातसुरु करायला पाहिजे. तेथे अध्यात्मिकज्ञाना बरोबर शेती विषयक माहिती मिळु शकते. सेवा केंद्रात ग्रामदेवताची पुजेचे महत्व समजते. शेती चांगली करण्याचे ज्ञान मिळते. दिंडोरी येथे स्वता प.पु.मोरे दादांनी शेती केली आहे. कृषी महोत्सव केंद्रास भेटी देवुन शेतीचे महत्व सांगितले आहे. .
Tags
news
