मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानुसार माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून प्रकल्पाच्या कामाची पाहणी






मे अखेरपर्यंत महत्वकांक्षी मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम होणार पूर्ण.

नाशिक शांताराम दुनबळे 

नाशिक -;  महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजवळ यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेल्या मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशावरून आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रकल्प स्थळी धरणाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मे अखेर पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, उपअभियंता सुभाष पगारे, सहायक कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे,दिलीप खैरे, मोहन शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गेल्या महिन्यात मंत्री छगन भुजबळ यांचा नियोजित मांजरपाडा दौरा कोविडमुळे रद्द करण्यात आला होता. त्यांनतर मंत्री छगन भुजबळ यांनी सदर प्रकल्पाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांना केल्या. त्या पार्श्वभूमीवर आज समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.

या अगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.दायित्वाला मंजुरी मिळाल्यावर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम  हे काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम ८७ टक्क्यांपर्यंत काम झाले असून मे अखेर पर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.  मांजरपाडा (देवसाने) मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून हे काम १५ मे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जलदगतीने काम करण्यात येत आहे.
त्याचबरोबर या भागातील देवसाने ते गोगूळ हा रस्ता काही कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरी ला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालूक्यातील डांगराळे भागातील गाव  आहे. घळभरणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावे पुन:श्च धरणमाथ्यावरील रस्त्याद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. या रस्त्यावर एकूण ३३ गर्डर बसविण्यात येणार असून त्यापैकी १७ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. तर इतर गर्डर बसवण्याचे काम सुरु असून  हे सर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी समीर भुजबळ यांनी दिल्या.

त्याचबरोबर धरणाच्या कामासोबतच कॅनल व त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात करण्यात येऊन येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत हे पाणी पोहचणार आहे.सन २०१९ पासून मुख्य वळण बोगद्याद्वारे पार नदीचे पाणी अंशत: वळविण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण झाल्यावर पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असून यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला व चांदवड ला पाणी उपलब्ध होणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने